सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधनेविषयी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

१. सत्संगाचे महत्त्व

सौ. मनीषा पाठक

जेव्हा तांदुळ कुंकवासह असतात, तेव्हा ते अक्षता होऊन देवाच्या चरणी जातात. जेव्हा तांदुळ डाळीसह असतात, तेव्हा त्यांची खिचडी होते. सत्‌चा संग मिळाला, तरच आपण देवाच्या चरणांशी जाऊ शकतो.

२. साधकत्व

अ. साधकांनो, स्वतःतील स्वभावदोषांचा त्याग करता आला पाहिजे.

आ. लहान व्हायला शिका ! (साधनेत न्यूनता घ्यायला शिका !)

इ. मनासारखे झाले, तर हरिकृपा आणि मनाच्या विरुद्ध झाले, तरीही हरीची इच्छा !

३. सेवा करतांना लक्षात ठेवावयाची सूत्रे

अ. धर्माच्या कार्यात खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलूया !

आ. सनातनचा एक जरी ग्रंथ प्रत्येक हिंदूच्या घरी गेला, तरी ते घर साधनारत होईल.

इ. आपण ‘काही घेण्यासाठी नाही, तर पुष्कळ काही देण्यासाठी जात आहोत’, असा भाव ठेवून जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या सेवेला जाऊया.

ई. साधकाने पाठपुरावा केल्यानंतर झालेली सेवा देवाजवळ पोचत नाही.

उ. एखाद्या सेवेचे दायित्व पहातांना ‘आपण सेवक आहोत. मालक नाही’, असा भाव ठेवावा.

४. देवाप्रती भाव ठेवण्याचे महत्त्व

अ. आपण देवाचा एक हात धरला की, देव आपले दोन्ही हात धरतो.

आ. श्रद्धेतून भाव आणि भावातून भक्ती असेल, तरच आपल्याला मुक्ती मिळू शकेल.

इ. अध्यात्मात बुद्धी खुंटीला टांगून ठेवूया आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करूया.

–  सद्गुरु स्वाती खाडये

संकलक : सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (२९.१.२०२२)