काश्मिरी हिंदूंसाठी महाराष्ट्रातील दारे कधीही उघडी ! – आदित्य ठाकरे

श्रीनगर – काश्मिरी हिंदूंसाठी महाराष्ट्राची दारे कधीही उघडी आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

काश्मीर खोर्‍यात काश्मिरी हिंदू, तसेच अन्य हिंदू यांच्या ‘लक्ष्यित हत्या’ (टार्गेट किलिंग) केल्या जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काश्मीर खोर्‍यात जाऊन पीडित हिंदु कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करत आदित्य ठाकरे यांनी वरील प्रतिपादन केले.