(म्हणे) ‘महाराष्ट्र पेटेल असे काही करू नका !’

  • हनुमान चालिसा लावण्याचे प्रकरण

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांची चेतावणी !

  • जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात शांतता राखण्याची एवढीच तळमळ आहे, तर मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत आहे, त्याविषयी का बोलत नाहीत ? – संपादक

  • सामाजिक सलोखा काय केवळ हिंदूंनीच राखायचा आणि धर्मांधांनी काहीही केले, तरी ते सहन करत रहायचे, हे किती दिवस चालणार ? – संपादक

  • नेतेच अशी चेतावणी देऊन फूस लावत आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? – संपादक

मुंबई – मी हात जोडून आवाहन करतो महाराष्ट्र पेटेल, असे काही करू नका. भाज्या, पेट्रोल सर्व काही महाग आहे. त्याविषयी बोला. जे विषय नाहीत, त्यांचे विषय बनवू नका, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.