पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम

मुंबई – पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम झाला आहे. हवेमध्ये पुष्कळ प्रमाणात धुळीचे कण पसरल्याने २३ जानेवारीला मुंबई आणि शेजारील शहरांमधील दृश्यमानता (समोरील दिसण्याचा भाग) अतिशय अल्प झाली होती. त्यात पहाटे पाऊस पडल्याने अनेक गाड्या आणि वस्तू यांवर पांढरे डाग पडले.

अचानक वातावरणात झालेल्या पालटामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. धुळीचे वादळ पाकिस्तानमधील कराचीमध्ये आले होते ते आता राजस्थान आणि गुजरात यांच्या दिशेने सरकत आहे. यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालवली आहे.