धाराशिव आगारात संपकरी आणि एस्.टी. कर्मचारी यांच्यातील वादामुळे कर्तव्यावरील कर्मचारी बेशुद्ध !

धाराशिव – ऐन दिवाळीत चालू झालेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपानंतर सरकारच्या आवाहनामुळे काही कर्मचारी कामावर आले; मात्र आंदोलकांच्या दबावापुढे त्यांचे काहीही चालत नाही.

(सौजन्य : TV9 Marathi)

२७ नोव्हेंबर या दिवशी धाराशिव आगारात आंदोलक आणि एस्.टी. कर्मचारी यांच्यात वाद झाला. तो ताण सहन न झाल्याने कर्तव्यावरील वाहक (कंडक्टर) बेशुद्ध पडला.