नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध न केल्यास दावा ठोकणार ! – अनिल बोंडे

माजी कृषीमंत्री श्री. अनिल बोंडे

अमरावती – ‘येथे भाजपने पुकारलेल्या ‘बंद’च्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाली. भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीच ही दंगल घडवली, तसेच त्यासाठी मुंबई येथून पैसा आला होता, ’ असा गंभीर आरोप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी नुकताच केला होता. मलिक यांच्या या आरोपानंतर भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी म्हटले की, नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध करून न दाखवल्यास त्यांच्यावर येथील न्यायालयात अब्रूहानीचा दावा प्रविष्ट करण्यात येईल. अमरावती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.