बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदु असुरक्षित ! – आमदार नीतेश राणे, भाजप

आमदार नितेश राणे

मुंबई – मालवणी भागातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा ठिकाणी जाऊन आम्ही हिंदूंमध्ये धारिष्ट्य निर्माण करणार आहोत. बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदू असुरक्षित आहे. मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले. बांगलादेशमधील रंगपूर जिल्ह्यात दुर्गापूजेच्या वेळी हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे वरील मत व्यक्त केले.