कळवा (ठाणे) येथील घोलाईनगर भागात पुन्हा भूस्खलन !

८ वर्षीय चिमुरडी किरकोळ घायाळ

ठाणे, १ सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात ३१ ऑगस्ट या दिवशी संततधार पडलेल्या पावसामुळे कळवा येथील घोलाईनगर भागातील जीवन खोल चाळ येथे १ सप्टेंबरच्या पहटे ३ वाजताच्या सुमारास भूस्खलन झाले. मातीचा ढिगारा मनोज मायकेल यांच्या मालकीच्या घराच्या छतावर पडला. त्यामध्ये घराच्या छताची हानी झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ८ वर्षीय सुश्री देवंशी चव्हाण ही चिमुरडी किरकोळ घायाळ झाली आहे. मागील मासातील ही तिसरी घटना ठरली आहे. यापूर्वी घडलेल्या घटनेत ५ जणांचा जीव गेला होता. त्यानंतर झालेल्या दुसर्‍या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती.