जनतेला (दळणवळण बंदीत) सवलती देण्यासाठी आणखी काही दिवस थांबावे लागेल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – जनतेला (दळणवळण बंदीत) आणखी सवलती द्यायच्या आहेत; मात्र वातावरण विचित्र असल्यामुळे आम्ही सावध पावले टाकत आहोत. कोरोनाचे संकट खरेच गेले आहे का ?, हे कळायला मार्ग नाही. अजूनही थोडे दिवस थांबावे लागणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. दैनिक ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोनाचा संदर्भ देत राजकीय विषयावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘अद्यापही हे संकट पुरते गेलेले नाही. नवे विषाणू येत आहेतच; पण काही जुने विषाणूही परत आले आहेत. हे जुने विषाणू वेगवेगळे ‘साइड इफेक्ट्स’ पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या विषाणूचा  बंदोबस्त करायचा आहे.’’