मुख्यमंत्र्यांना ७५ सहस्र पत्रे पाठवून भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याची आठवण करून देऊ ! – आशिष शेलार, भाजप

डावीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आशिष शेलार

मुंबई – देशाचा अमृत महोत्सव कि हीरक महोत्सव, हे राज्याचे मुख्यमंत्री कसे विसरू शकतात ? त्यांनी हा संभ्रम जाणीवपूर्वक केला का ?, याची जाणीव करून देण्यासाठी भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने ७५ सहस्र ‘पोस्टकार्ड’ पाठवून भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली, याची मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी २५ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केले. या वेळी आशिष शेलार म्हणाले, ‘‘त्यानंतरही सुधारणा झाली नाही, तर आम्ही गांधीगिरी करत मुख्यमंत्र्यांना गुलाबाचे काटे पाठवून ही आठवण करून देणार आहोत.