१७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई – राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून चालू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर यावर कार्यवाही होईल, असे त्यांनी म्हटले. सध्या इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग चालू करण्यात येणार आहेत. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या कोरोनाविषयक नियमावलीच्या आधीन राहून शाळा चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ६ ऑगस्ट दिवशी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.