पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील १ सहस्र २८ गावे बाधित !

मृतांची संख्या १६४

मुंबई – पूरस्थितीमुळे राज्यातील १ सहस्र २८ गावे बाधित झाली असून आतापर्यंत १६४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पूरग्रस्त भागातून २ लाख २९ सहस्र ७४ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून अद्याप १०० लोक बेपत्ता आहेत. पुरामध्ये २५ सहस्र ५६४ पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २५९ निवारा केंद्रे उभारण्यात आली असून त्यामध्ये ७ सहस्र ८३२ जण आहेत.