वाचकांना निवेदन 

अतीवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि राजापूर भागांत पूरस्थिती कायम आहे. चिपळूण येथे वासिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गही बंद झाला आहे. यामुळे या भागांतील, तसेच या मार्गावरील वाचकांना दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित पोचवण्यात अडचण येत आहे. ज्या वेळी वाहतूक पूर्ववत् चालू होईल, त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वितरण करण्यास शक्य होणार आहे. वाचकांनी आतापर्यंत जसे आम्हाला सहकार्य केले, तसेच सहकार्य यापुढेही करावे, ही विनंती ! – संपादक