बहुतेक धर्मांचे लोक हिंदूंचे वंशज ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – हिंदुत्वाचा प्रारंभ ५ सहस्र वर्षांपूर्वी झाला आहे. त्याला कुणी रोखू शकत नाही. हिंदुत्व एक जीवनपद्धत आहे. त्यामुळे याला कुणी कसे रोखू शकेल ? बहुतेक सर्व धर्मांचे लोक हिंदूंचे वंशज आहेत. त्यामुळे हिंदुत्वाला हटवले जाऊ शकत नाही. तसे करणे याचा अर्थ आपली मुळे आणि मातृभूमी यांपासून दूर जाण्यासारखे आहे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका पत्रकार परिषदेत केले. त्यांच्या शासनाला २ मास झाल्याच्या निमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.