देशाला अपकीर्त करण्यासाठी राष्ट्रविरोधी टोळी विदेशी शक्तीचा उपयोग करत आहे ! – विनोद बन्सल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

श्री. विनोद बन्सल

श्रीराममंदिराच्या भूमी खरेदी घोटाळ्याचा विरोधकांनी केलेला आरोप फोल ठरला. आरोप खरे असते, तर आरोप करणारे सर्वोच्च न्यायालयात का गेले नाहीत ? या प्रकरणी त्यांनी तक्रार का केली नाही ? मुळात श्रीरामाला काल्पनिक ठरवणारे लोकच श्रीराममंदिराच्या उभारणीला विकृत मानसिकतेतून विरोध करत आहेत. या माध्यमातून राष्ट्रविरोधी टोळी कार्यरत असल्याचे आता उघड होत आहे. ही टोळी सक्रीय असून ती देशाला अपकीर्त करण्यासाठी विदेशी शक्तींचा वापर करत आहे. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात ‘श्रीरामाचे अस्तित्व होते’, हे पटवून देण्यासाठी, तसेच त्याच्या जन्मभूमीच्या मुक्तीसाठी संघर्ष करावा लागला, यातूनच हे अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते.