निलंबित आमदारांची राज्यपालांकडे तक्रार
मुंबई, ६ जुलै – भाजपाच्या आमदारांना निलंबित करण्याचे षड्यंत्र सरकारने रचले. भाजपाच्या कोणत्याही सदस्याने कोणताही अपशब्द उच्चारला नाही. तरीही एकतर्फी कारवाई करत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. आम्हाला आमचे म्हणणे मांडू दिले नाही. महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी तक्रार भाजपच्या निलंबित केलेल्या १२ आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ५ जुलै या दिवशी केली.