भाजप आमदारांचे निलंबन केले हा शिस्तीचाच भाग ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत

मुंबई, ६ जुलै – भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाची कारवाई हा शिस्तीचा भाग आहे. असे केले नाही तर सभागृहात दंगली निर्माण होतील. पाकिस्तानाच्या सभागृहात काय घडते ? उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही कधी कधी ही परिस्थिती उद्भवते. महाराष्ट्रात ही परंपरा पडू नये यांसाठी हा कठोर निर्णय अध्यक्षांनी घेतला, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाद्वारे महाविकास आघाडी सरकारची एका वेगळ्या पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते आमच्यावर ‘बॉम्ब’ टाकण्याचा प्रयत्न करत होते; परंतु तो बॉम्ब त्यांच्यावरच फुटला.’’