अतीवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील ३ गावच्या ग्रामस्थांना स्थलांतराची सूचना

अतीवृष्टीने स्थलांतर

वेंगुर्ला – ११ ते १३ जून या कालावधीत अतीवृष्टी होण्याची शक्यता असल्याने वेंगुर्ला तालुक्यातील पलतडवाडी, तुळस; केळूस आणि श्रीरामवाडी, कोचरे या ३ गावांतील जोखीम क्षेत्रातील ६० कुटुंबांना त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध असलेल्या शासकीय इमारतींमध्ये स्थलांतरित होण्याच्या नोटिसा शासनाकडून देण्यात आल्या आहेत. पलतडवाडी येथे दरड कोसळून, तर केळूस आणि श्रीरामवाडी येथे खाडीचे पाणी लोकवस्तीत घुसून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने या नोटिसा देण्यात आल्या आहेत.