कोरोना हे चीनचेच षड्यंत्र असल्याने तिसरे महायुद्ध म्हणूनच लढावे लागणार ! – ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया

ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया

पुणे – कोरोना विषाणूचा प्रसार हे चीनचेच षड्यंत्र आहे. त्यामुळे भारताने हे तिसरे महायुद्ध म्हणूनच लढायला हवे. वुहान येथील प्रयोगशाळेत चीनने कोरोना हा विषाणू सिद्ध केला आणि त्यासह त्याविरुद्धची लसही विकसित केली. जगातून यावर काय प्रतिक्रिया येते ? याचा अंदाज घेतला. जगातील कोट्यवधी लोक या विषाणूने मृत्यूमुखी पडत असतांनाही कोणत्याही देशाचे चीनसमवेतचा व्यापार बंद करावा किंवा अल्प करावा, असे धाडस झाले नाही. भारतासह जगातील अन्य देशांनी चीनसमवेतचा व्यापार चालूच ठेवला, असे मत ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले. (आतातरी भारतियांनी राष्ट्राभिमान दाखवून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा. तसेच सरकारनेही चीनशी व्यापार बंद करायला हवा ! – संपादक) फिरोदिया म्हणाले की, कुणालाही ही ‘कॉन्स्पिरसी थेअरी’ वाटेल; परंतु ‘कोविड-१९ विषाणू’ हा चीनच्या प्रयोगशाळेतच सिद्ध झाला आहे. चीनमधील गुंतवणूक येत राहिली. जगाचा हा कचखाऊ प्रतिसाद पाहून चीनचे धाडस वाढले. त्यामुळे त्यांनी विषाणूचा दुसरा ‘व्हेरिएंट’ सिद्ध केला. त्यालाच आता ‘भारतीय व्हेरिएंट’ म्हटले जाऊ लागले आहे. आता त्यांनी तिसरा ‘व्हेरिएंट’सिद्ध केला आहे. लहान मुलांसाठी तो घातक ठरणार आहे. यासाठी देशभर मजबूत आरोग्य यंत्रणा उभी करण्यासह संपूर्ण देशाचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.