देशात प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू !

नवी देहली – देशात कोरोनामुळे मागील १४ दिवसांमध्ये मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘कोविड ट्रॅकर’नुसार देशात सध्या प्रतिदिन साधारणतः ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू होत आहे. ४ आठवड्यांआधी ही संख्या ७८७ च्या जवळपास होती. कोविड ट्रॅकरनुसार भारतात मागील १४ दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत ८२ टक्के वाढ झाली आहे.

४ आठवड्यांपूर्वी भारतात प्रतिदिन सरासरी १ लाख ४३ सहस्र ३४३ नवे रुग्ण आढळत होते; मात्र आता प्रतिदिन साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत.