सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणार्‍या संदेशाला बळी पडू नका ! – श्रीमती ए.एस्. कांबळे

पुणे – १ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० वर्षे या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांना महिला आणि बालविकास विभागाच्या जिजामाता योजनेअंतर्गत ५० सहस्र रुपये मिळतील, असा संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहे; मात्र अशी योजना महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने कार्यान्वित नसल्याने नागरिकांनी या संदेशाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीमती ए.एस्. कांबळे यांनी केले आहे.