अत्यल्प, मध्यम आणि तीव्र प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्‍यांची भाजी खाण्याच्या प्रयोगापूर्वी आणि प्रयोगानंतर साधिकेला जाणवलेली सूत्रे

बटाट्याच्या काचर्‍या

१. प्रयोगापूर्वी

कु. तृप्ती कुलकर्णी

‘३०.११.२०२० या दिवशी अत्यल्प, मध्यम आणि तीव्र प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्‍यांची प्रत्येकी १ वाटी भाजी खाण्याचा प्रयोग करण्यात आला. प्रयोगापूर्वी मला आध्यात्मिक त्रास होत असल्याने मी ४५ मिनिटे ध्यानमंदिरात बसून नामजपादी उपाय केले. तरीही त्रास न्यून होत नव्हता.

२. तीव्र प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्‍यांची भाजी

२ अ. प्रयोगाला गेल्यावर

१. मला सकाळी १० वाजता भाजी खाण्यास दिली. भाजी खाल्ल्यावर तोंडात तिखटाची चव पुष्कळ प्रमाणात जाणवत होती; पण पाणी न पिताही केवळ ५ मिनिटांतच तिखटाची चव नाहीशी झाली.

२. मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीचे अस्तित्व पुष्कळ प्रमाणात वाढल्यानेच तिखटाची चव पाणी न पिताही नाहीशी झाल्याचे जाणवले.

२ आ. प्रयोगानंतर : प्रयोग झाल्यानंतर मला भूक न लागल्याने विशेष जेवू शकले नाही. पुढील ३ घंटे पोटात जळजळत होते.

३. मध्यम प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्‍यांची भाजी

३ अ. प्रयोगाला गेल्यावर : मला दुपारी २ वाजता १ वाटी भाजी खाण्यासाठी देण्यात आली. तेव्हा पोटात अतिशय शांतता जाणवली आणि मनाला समाधानही लाभले.

३ आ. प्रयोग झाल्यानंतर : प्रयोग झाल्यानंतर थोड्याच वेळात मला पुष्कळ भूक लागल्याने मी अल्पाहार केला.

४. अत्यल्प प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्‍यांची भाजी

अ. मला सायंकाळी ७ वाजता १ वाटी भाजी खाण्यासाठी दिली. त्या काचर्‍यांचा पहिलाच घास खाताक्षणी तोंडात एकदम सात्त्विकता पसरल्याचे जाणवले.

आ. वाटीभर काचर्‍यांची भाजी खाऊन पूर्ण झाल्यावर मनाला समाधान वाटले. पोटातही शांतता जाणवत होती.’

– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(३०.११.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक