गोपालगंज (बिहार) येथील विषारी दारूच्या प्रकरणी ९ जणांना फाशी, तर ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा

साडेचार वर्षांनंतर निकाल !

१९ जणांचा मृत्यू झाल्याच्या या प्रकरणाचा निकाल लागण्यास इतकी वर्षे लागणे अपेक्षित नाही !

गोपालगंज (बिहार) – येथील खजूरबानीमध्ये १६ ऑगस्ट २०१६ मध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ६ जण आंधळे झाले होते. या प्रकरणी गोपालगंजमधील न्यायालयाने ९ आरोपींना फाशीची आणि ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एका आरोपीचा सुनावणीच्या काळात मृत्यू झाला.