राजभवनातील संबंधित अधिकार्‍यांवर दायित्व निश्‍चित करण्यात यावे !

मुंबई – राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींविषयी राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते. ते झाले नसल्याने या प्रकाराविषयी शासनाने गंभीर नोंद घेतली आहे. राजभवनातील संबंधित अधिकार्‍यांवर दायित्व निश्‍चित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनातील संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. राज्यपालांचे विमान मुख्यमंत्री कार्यालयाकडून अडवल्याच्या प्रकरणावरून ते बोलत होते.