असोदा (जिल्हा जळगाव) येथील मतदान केंद्रावर पोलिसांचा उमेदवारांवर सौम्य लाठीमार

प्रतिकात्मक चित्र

जळगाव – जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान चालू झाले. सर्व ठिकाणी शांततेत मतदान पार पडले; पण असोदा येथे पोलिसांनी उमेदवारांवर सौम्य लाठीमार केला. काही पॅनलचे उमेदवार मतदान केंद्रावर जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. यावर इतर पॅनलच्या उमेदवारांनी हरकत घेतली. पोलिसांनी उमेदवारांना सांगूनही ते मतदान केंद्राबाहेर जात नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. लाठीमारानंतर उमेदवार मतदान केंद्रातून बाहेर पडले.