कोरोनाच्या भीतीने मुंबई सोडणार्‍या परप्रांतियांना पोलिसांनी पकडले

मुंबई – कोरोनाच्या भीतीमुळे अनेक परप्रांतीय मुंबई सोडून जात असल्याचे पोलीस पडताळणीत आढळून येत आहे. २८ मार्च या दिवशी पालघर येथून दुधाच्या टँकरमधून राजस्थान येथे निघालेल्या १२ नागरिकांना कल्याण येथे पोलिसांनी पकडले. तसेच राजस्थान येथे निघालेला परप्रांतियांचा ट्रक पोलिसांनी मुलुंड येथे पकडला. अनेक परप्रांतीय वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे चालत स्वत:च्या राज्यात निघत आहेत. ठाणे येथे राजस्थानला निघालेल्या काही युवकांना पोलिसांनी पकडले. या ट्रकमध्ये ६४ जण दाटीवाटीने बसले होते. तसेच मुंबईहून काही नागरिक जीव धोक्यात घालून मासेमारी करण्याच्या बोटीतून कोकणात गुहागर येथे गेल्याचे आढळून आले आहे.